नमस्कार,
मित्र ग्रुप व शांती नर्सिंग होम तर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा २०१९ ची प्राथमिक फेरी १६ ते १८ सप्टेंबर रोजी शांती नर्सिंग होमी येथे पार पडली असून त्यात ७६ गटांनी आपला सहभाग नोंदविला. अंतिम फेरीकरिता गुणानुक्रमे निवड झालेल्या ६ संघांची नावे तसेच सर्व संघांची गुण पत्रिका सोबत जोडलेली आहे.
अंतिम फेरी दिनांक ०२ ऑकटोबर रोजी सायंकाळी ०५ ते ०८ या वेळेत आय. एम. ए. हॉल, विवेकानंद कॉलेज समोर, औरंगाबाद येथे होणार आहे.
स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या २ (उत्कृष्ठ वक्ता आणि समीक्षक) पुरस्कार विजेत्यांची नावे अंतिम फेरीच्या दिवशीच जाहीर केली जातील.
तरी आपणांस विनंती की, आपल्या संघाची निवड झालेली असो अथवा नसो अंतिम फेरीतील वक्त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित राहावे.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे मनःपूर्वक आभार आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन…..!!!
धन्यवाद….!!!