दिनांक १४, १५, १६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन प्राथमिक फेरीत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील तब्बल ४८ गटांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा विषय होता ‘५०० मीटरचा कायदा, सर्वांचा फायदा’. या विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजुंनी सहभागी विद्यार्थ्यांनी आपली मते उत्स्फूर्तरित्या मांडली.
स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा सन्मानीय पाहुणे, सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री. मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सोमवार, दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी सायं ०६.०० ते ०९.०० या वेळात रुख्मिणी हॉल, एम. जी. एम. परिसर, सिडको, औरंगाबाद येथे आयोजित केला आहे.
अंतिम फेरीचा विषय आहे :
‘समाज माध्यमे आपल्याला अ-सामाजिक बनवत आहेत.’
अर्थात,
‘Social Media is making us a-social’
स्पर्धेच्या नियमांनुसार गुणानुक्रमे अंतिम फेरीकरिता निवड झालेल्या ०५ महाविद्यालयांची यादी जोडली आहे.
अंतिम फेरीकरिता निवड झालेल्या सर्व गटांना हार्दिक शुभेच्छा….!!!
स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे :